Thursday, February 19, 2015

जग बंधू नंतरचे

जग बंधू  नंतरचे 




बंधू नंतरचे जगच बदलले होते दोन्ही  पारिवार
 जणू एकत्रच आले होते ,माजी अमुलाग्र बदलल्या होत्या ,मी आणि चैतू त्यांना   आपल्या मुलासारखेच वाटत होतो ,फक्त हा बदल बंधूंच्या निर्वाणा नंतरच झाला  होता
माझे  एम बी बी स  चे शेवटचे वर्ष होते परीक्षेच्या तयारी च्या वेळी युवराज स्वतः लक्ष घालून होते त्यांच्या अवाढव्य व्यवसायात मग्न असूनही त्यांचे लक्ष सदैव   माझ्याकडे केद्रित होते ,माझ्या पेक्षा काहीच वर्षाने मोठा असणारा हा युवक माझ्या वडिलांच्या भूमिकेत वावरताना मला दिसत होता जणू बंधूच मला परत मिळाले    होते ,माझ्या अभ्यासाची खोली त्यांच्या खोलीच्या बाजूलाच होती रात्र रात्र    अभ्यास करून मी थकून पुस्तकात डोके टेकून झोपलो तर मला हळूच उठवत आणि म्हणत पंचम झोप आता ,सकाळी अभ्यास कर ,जबरदस्तीने झोपायला लावत ,सकाळी उठवत ,अभ्यासाला बसायला सांगत आणि एखाद्या लहान मुलासारखी   माझी काळजी   घेतमाझ्या परीक्षेत ते स्वतःचे वायाच ते विसरले होते ,.
एका रात्री अभ्यास करता करता मी पुस्तकावर डोके ठेऊन झोपलो ,मला हळूच   उठवून  युवराज म्हणाले पंचम शांत झोप आता उद्या अभ्यास करा ,युवराजांच्या प्रेमाने मनाचे सर्व  बांध फुटले डोळे अश्रुनी डबडबून आले ,युवराजांनी डोळे पुसले  
मला म्हणाला पंचम बंधूंची आठवण येतेय का  युवराज म्हणाले ,नाही युवराज त्यांची आठवण येत नाही मला कारण तुमच्यात ते माझ्यासाठी वावरताना दिसताहेत ते नाही आहेत असे वाटतही नाही मला मग तेसमोर असताना आठवण कशी येईल ,आठवण समोर नसलेल्यांची येतेसकाळी उठलो तेव्हा युवराज फोने वर बोलत होते
१५ दिवस कुठेही जाता येणार नाही मला त्यांच्या सेक्रेटरीला ती सांगत होते ,माझी परीक्षा १५ दिवसात संपणार होती ,माझ्यासाठीच युवराज कुठेही बाहेर जाणार   नव्हते ,एक महत्वाची बिसनेस मिटिंग होती ती पण त्यांनी पुढे ढकलली   होती , परीक्षेच्या आदल्या रात्री मी अभ्यास करताना युवराज खोलीत आत आले  मला हाताला धरून बंधूंच्या फोटो समोर घेऊन गेले हात जोडून म्हणाले बंधू   आपल्या पंचमची उद्या पासून परीक्षा आहे त्याला आशीर्वाद द्या ,भरलेल्या    डोळ्यातून पाणी वाहू लागले ,माझे डोळे पुसतात पुसता युवराज म्हणाले पंचम  रडता का?" नाही युवराज हे आनंदाश्रू आहेत तुम्ही माझ्यासाठी मागायच्या   अगोदरच बंधूनी मला आशीर्वाद दिला आहे ,हा बघा म्हणून" युवराजना  मिठी   मारून मी म्हणालो ,आणि डोळे पुसायची पाळी  माझी  होती"युवराज स्वतः   मला सोडायला येत ,परीक्षेनंतर घरी घेऊन जायलाही येत ,माझा पूर्ण ताबा त्यांनी घेतला होता ,माझ्यापेक्षा तेच ज्यास्त  दबावाखाली वाटत होते जणू तेच परीक्षा देत होते , युवराज स्वतः मला सोडायला येत ,परीक्षेनंतर घरी घेऊन जायलाही येत ,माझा पूर्ण ताबा त्यांनी घेतला होता ,माझ्यापेक्षा तेच ज्यास्त  दबावाखाली वाटत होते जणू   तेच परीक्षा देत होते ,
मला   परीक्षेत हमखास यश मिळणार ह्याची मला पूर्ण खात्री वाटत होती ,  परिक्षेच्या  शेवटच्या" दिवशी  परीक्षा आटोपल्यावर माझ्या हातात ५०० रुपयांची  नोट  देऊन म्हणाले पंचम तुमच्या मित्रामैत्रीणींना  घेऊन आज सिनेमाला जा ' 
,बर युवराज" मी म्हणालोसिनेमाची दोन तीकीटे                 घेउन मी घरी आलोत्यांना म्हणालो" चला युवराज निघूया आपण कुठे ,  सिनेमाला उशीर होईल नाही तर" ,मी अरे मित्रांना घेऊन जा म्हणालो" मी,मग   तुम्ही काय शत्रू आहात का माझे ,आणि असाल तर असा शत्रू आवडेल मला , ,माजी आज आम्ही बाहेरच खाऊ काही तरी ,चालेल  युवराज ,होहो चालेलच काय धावेलाही" असे म्हणून युवराज कपडे करायला वर गेले ,खाली आलेल्या   युवराजन कडे मी डोळे विस्फारून बघत होतो युवराज एका निळ्या जीन आणि   निळया  टी शर्ट मध्ये खाली आले नेहमी फोरमल मध्ये असणाऱ्या युवराजांचे   मित्र रूप मला लोभसवाणे वाटले ,"लवकर यारे" माजी म्हणाल्या ",हो फक्त   पंचमची  एखादी मैत्रीण नाही भेटली तर आम्ह्ही दोघेही लवकर येऊ" ,हसत   युवराज म्हणाले
आणि तुमची मैत्रीण भेटली तर ,मग शहाण्या मुलासारखे तुम्ही  एकट्याने  लवकर यायचे मिश्कील पणे युवराज म्ह"णाले . बगल्यातून खाली  उतरलो गाडी चे दार उघडत ड्रायवर म्हणाला कुठे जायचं? कुठेही नाही ",माझ्या बाईक वर बसून युवराज मला म्हणाले     सर्व नोकर मंडळी तो भरत मिलाप पाहत होते , वरती ग्यालरीत माजी  .   डोळ्याला पदर लावत .उभ्याहोत्या

 सिनेमा बघता बघता  युवराज मधेच म्हणाले सिनेमा बघताय का नाही? मी    हि  नाही मी म्हणालो मग चला तर    समुद्रावर जाऊया  हो जरूरआता मी बाईक चालवणार  दोघेही   मित्र समुद्र किनारी आलो  वाळु  तुडवत तुडवत चालू  लागलो     भाऊ ,मित्र ह्या साऱ्या नात्यांचे अगणित रेशम बंध एकमेकात कसे गुंफत गेले ते 
कळले पण नाही
निकालाचा दिवस जसजसा जवळ येताहोता तास तशी उत्कंठा वाढत होती  ,माझ्यापेक्षा युवराज जास्त अस्वस्थ वाटत होते निकालाच्या पूर्व संध्येला विद्यापीठातून मला फोये आला आणि मी सर्वच विषयात पहिला आल्याचे विद्यापीठाने मला 
कळवले ,सर्व विषयात मी रेकॉर्ड ब्रेक केले होते ,माझ्या यशाने माझ्या पेक्षा युवराजच जास्त आनंदित झाले होते ,बंधू च्या खोलीत मला घेऊन जाऊन ते स्वामी आणि बंधूंच्या  फोटो समोर उभे राहिले ,माझ्या  मस्तकावर हात ठेऊन म्हणाले बंधू तुम्ही जिंकलात आपला पंचम पहिला आला ,स्वामींची भक्ती तुम्हाला फळली ,मनाचे 
बांध फुटून आनंद त्यांच्या डोळ्यावाटे आसवाच्या रूपाने वाहत होता .अति 
परिश्रमाने थकलेल्या माणसाचा थकवा अचानक दूर झालेल्या माणसासारखे ते 
वाटत होतेशांतपणे बिछान्यावर पडले ,त्यांना गाढ झोप कधी लागली ते कळलेही नाही , सकाळी हि ते झोपलेले होते मला मात्र सकाळीच जाग  आली युवराजांच्या   चेहऱ्यावर समाधानाची साय पसरली होती.

मी बंधूंच्या घरी असल्याचे माझ्या सर्व मित्रांना परचीताना माहित असल्याने ते सर्व सकाळपासून बंगल्यावर येत होते ,आई बाबा चैतू माजी सगळे आनंदाच्या   सर्व सीमा पार करून  उल्हासित झाले होते ,सर्वांची सरबराई युवराज जातीने करत होते संध्याकाळी माजीने मला ओवाळले आई नि आणि त्यांनी माझी दृष्ट काढली मी त्यांच्या पाया पडताच पोटाशी धरून त्या ढसा ढसा रडल्या बंधूंच्या फोटो कडे   बघून म्हणाल्या" आज तुमच्या ह्या धाकट्या मुलाचे यश पहायला तुम्ही हवे   होतात ",आई नि त्यांना सावरले .एक लिफाफा  त्यांनी माझ्या हातात दिला , 
'काय आहे त्यात?, मी म्हणालो तुम्हीच बघा ,माजी म्हणाल्या आत एक एक करोड रुपयांचा चेक होता आणि propertyचे  कागद पत्र ,हे कशासाठी? मी म्हणालो 
'तुमच्या बंधूंची इच्छा पूर्ण करण्या साठी' , शहरातल्या मध्यवर्ती भागात 
गोरगरीबांसाठी निशुल्क सेवेचे एक रुग्णालय बांधावे अशी त्यांची इच्छा होतीरात्री युवराज एकटेच बसले होते मी आल्यावर म्हणाले' पंचम आता तुम्हाला जराही वेळ मिळणार नाही पुढचे शिक्षण आणि हॉस्पिटलचे बांधकाम दोन्ही बघायाचे आहे' 
तुम्हाला व्यक्तीशः आम्हालाही  काही तरी भेट द्यावीशी वाटते काय? हवे आमच्या छोट्या भावाला' ,दादा मला एक वाहिनी पाहिजे आहे ,मी म्हणालो जरूर दिली 
तुम्हाला वाहिनी पण एका अटीवर आम्हाला दादा म्हणून हाक मारणारे कोणी नाही तुम्ही मात्र तीहाक मारत असाल तर तर तुमची मागणी मंजूर'युवराज म्हणाले 
मग चल तर दादा' मी म्हणालो कुठे ?दादा म्हणाले वहिनी शोधायला' मी म्हणालो काळाचा ओघ चालूच होता ,दादांचा विवाह सोहळा संपन्न झाला ,,वाहिनीचे 
आगमन झाले ,विवाह सोहळ्याला प्रचंड जनसमुदाय लोटला होता ,बंधूंच्या 
लोकप्रियतेची एक जिवंत साक्ष ,नवागत वधूचे नाव माजीनी .भक्ती 
.ठेवले ,सोन पावलांनी आलेल्या नाव वधुनी सर्वाचेच मन जिंकून घेतले होते ,एका घरंदाज घराण्याची सर्व संस्कार क्षमता घेऊन नव वधू  आली होती ,,वाहिनीही 
व्यवसायाने डॉक्टर होत्या ,घरातल्या सर्वांचे पालकत्व त्यांच्याकडे गेले , एक 
दिवस संध्याकाळी दादांनी मला बोलावले आणि सांगितले कि व्यवसायाच्या 
निमित्त्याने त्यांना परदेशी जावे लागेल आणि साधारण एक महिन्याचा अवधी लागेल ,दादांना मी गळ घातली कि त्यांनी वाहिनीनाही बरोबर घेऊन जावे.दादा कसेबसे तयार झाले वाहिनी म्हणाल्या पंचम इथले कोण बघेल माजीना काय वाटेल? ,आई माझ्या सह्य्याला आली म्हणाली "तू जाग" युवराजन बरोबर इथली काळजी करू नकोस आम्ही दोघी आहोत इथे ,आईच्या आश्वासनावर वाहिनी तयार झाल्या ,  , जायच्या आदल्या दिवशी दादा आणि वाहिनी माझ्या कडे बोलत बसले होते ,
मधेच मला म्हणाले पंचम काय आणू तुम्हाला ,'बाहुला मी म्हणालो' ,काय 'बाहुला लहान का आहात तुम्ही ?,नाही मोठा झालोय म्हणून काका म्हणून मला हांक 
मारणारा पुतण्या मला भेट म्हणून पाहिजे दादा ,फार वाय्हात झाला आहेस तू दादा म्हणाले' आणि वाहिनीकडे बघून म्हणाले तुमच्या लाडक्या दिराची फरमायिश  ऐकलीत तुमची अनुमती आहेना?
,
तिचीही आहे आणि आम्हा दोघींची तिच्या सासवांची पण आहे दरवाजाने आत 
येणाऱ्या आई आणि माजी एक सुरात म्हणाल्या 


No comments:

Post a Comment