Friday, March 27, 2015

cover tulshipatra

             





शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२

Tuesday, March 24, 2015



 तुळशीपत्र 
                                             
                                       




शशांक रांगणेकर 

Monday, March 23, 2015

मनोगत

                                                                         

मनोगत 
                                                                         

स्वामी समर्थ हे माझे लाडके दैवत . अगदी "माझा स्वामी "म्हणण्या इतके . मी त्याची फार उपासना करतो पूजा अर्चा करतो अशातली गोष्ट नाही ,पण तो सदैव माझ्या बरोबर आहे हि अनुभूती मात्र कायमची मनात तेवत असते . तो माझा कोण आणि मी त्याचा कोण ?ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसूनही तो माझा इतका  जवळचा आहे तेवढ्या जवळचे कोणीच नाही हि जाणीव मात्र मनात कायमची उमलत असते .त्याच्या आणि माझ्या नात्याला नाव नाही  कारण एखाद्या नात्याला नावाचे लेबल चिकटले कि त्याच्या मर्यादा अधोरेखांकित होतात .अगदी  आई बाप काका मामा मित्र गुरु सुद्धा ,पण इथे मात्र तसे नाही काही  नाती एवढी व्यापक असतात कि बळीच्या अवतारा  सारखी तिन्ही लोक व्यापूनही दशांगुळे अव्याप्त राहणारी . जेव्ह्या नात्याचे स्वरूप एवढे अमर्याद असते तेव्हा त्याला अमरत्वाची तेजस्वितता येते . 
"तुळशीपत्र 'हि अशीच कहाणी आहे जन्म आणि मृत्युच्या सीमा रेषा पार करणारी आणि स्वामींच्या इच्छेने गत जन्माची खुण सांगत पुनर्जन्म घेणारी . हि कथा हे त्यागाचे ,पावित्र्याचे ,आणि निरलस प्रेमाचे प्रसादचिन्ह आआःए. आवड ,प्रेम भक्ती ह्या एकाच भावनेच्या चढत्या कमानी आहेत . 
नात्याच्या सर्व लौकिक अर्थाना पार करून पुढे जाणारे नाते मग ते माणसाचे माणसाशी सो अथवा  परमेश्वरा शी  असो ते एका अत्त्युच्या पातळीवर पोहचते ,ह्या कथेतील तीन मुख्य पत्रे "बंधू पंचम आणि स्वामी ह्यांच्या अनुपम नात्याची हि कहाणी आहे ,ह्या नात्याला काय म्हणावे सगळेच अगम्य आणि अतर्क्य ,"मै  गया  नाही अभीभी जिंदा हु "असे सांगणाऱ्या स्वामींच्या  अमरत्वाची प्रचीती देणारी एक अमर प्रेम कहाणी ."ह्या अलौकिक त्रिकोणात वर्तमान भूत आणि भविष्य सारे काही बंदिस्त आहे कारण ह्या सर्वांचा   एकमेव   स्वामीही    तोच आहे 


                                                                         "श्री स्वामी समर्थ "


शशांक  रांगणेकर 

Tuesday, March 3, 2015

पुनरागमन


                           पुनरागमन

दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला .सत्काराच्या  वेळी दादांचा फोन आला कि मला मुलगा झाला आहे. शेखर खुणा करून मला हि बातमी कळवत होता .सत्कार समारंभ  संपवून आम्ही हॉटेल वर गेलो .दादांनी फोन वरून सांगितले कि बाळ  आणि मंजुषा सुखरूप आहेत आणी  झोपली आहेत, आदि मात्र झोपला नव्हता ,बोबड्या भाषेत म्हणाला "काका आपल्या कडे बाल आला आहे ,लवकर बघायला ये "."उद्याच येतो "मी म्हणालो ,इथली काळजी करू नकात ,बाळ बाळांतीण दोघेही सुखरूप  आहेत ,वाहिनी म्हणाल्या ,सत्काराचा कार्यक्रम सर्वांनी दूर दर्शन वर बघितला होता .

"पंचम झोपूया आता "शेखर म्हणाला फ्लाईट पहाटेची असल्याने आम्ही झोपलो ,थकल्याने बिछान्यावर पडतापडताच  झोप लागली . डोळे आसवानी भरून आले होते सुखाच्या राशीवर असूनही मी दुखखी  होतो ."स्वामी सगळे दिलेस पण हे बघायला माझे बंधू कुठे आहेत ,त्यांचा तो प्रेमळ स्पर्श मला आज पाहिजे होता
त्या वाचून मी भिकारी आहे रे "डोळे पाझरत होते आणि मनही  हलकेच झोप लागली ,पाहटे पहाटे स्वामींच्याच
शब्दांनी जाग आली "तू जिथे तिथे तो आणि मीही  उद्याच तुला आमच्या शब्दांची प्रचीती येइल. "

सकाळी विमानात  बसलो ,मन घराकडे घिरट्या मारत होते ,विमानतळावर दादा आणि आदी आले होते ,"काका बाल आला आहे पण तो सारखा रडतोय आमच्याशी खेळत नाही तो आजीने त्याला बांधून ठेवले आहे "अस का ?
आपण सोडवूया त्याला    मग आपण खेळूया मी म्हणालो .गाडी हॉस्पिटलच्या आवारात शिरली ,मी उतरताच टायगर ने भुंकून मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो समोर थांबवले ,तिथे डोके ठेऊन मी आत गेलो.


आई ,माजी , वाहिनी मंजुशाच्या रूम मध्ये होत्या  बाळ  रडण्याचा  आवाज येत होता ,मंजुशाच्या चेहऱ्यावर सुखाची साय दाटली होति.        घे बाबा बाळाला माजी म्हणाल्या आणि बाळाला अलगद उचलून त्यांनी माझ्या हातात दिले ,मी आनंदाने बाळाला कवटाळले ,"स्वामी समर्थ "मन हुंकारले "मानत विचार आला आज तुम्ही असायला हवे होतात बन्धु.  बाळा नि  इतक्यात माझ्या अंगावर सुसु केली ,,आईने दुपटे सोडवले ,आणि आई आणि माजी बाळाला पुसू लागल्या, माजींचे  लक्ष बाळाच्या छातीकडे गेले त्याच्या छातीवर एक सुस्पष्ट कुणालाही कळेल अ शी तुळशी पत्राची जन्म खूण  होति.

"बंधू माझ्यासाठी परत आलात ना "मनात विचार उमटले  नकळत स्वामींच्या फोटो कडे लक्ष्य गेले  माझा स्वामी माझ्या कडे बघून मिश्किलपणे  हसत होता फ़ोटोच्या  गळ्यातले बिल्व पत्राचे त्रिदल एका वेगळ्या आणि अपूर्व तेजाने  नाहून निघाले होते ,बंधूचा पारिजात फुलांनी बहरला होता .

बंधू तुम्ही माझे कोण ?मनात प्रश्न आला , मला माहित नाही  स्वामींना विचार , मलाही माहित नाही  उत्तर आले पण आकाशातून . श्री  स्वामी समर्थ'
शशांक रांगणेकर

९८२१४५८६०२ 

सोहळा

           सोहळा               
मंजुषा च्या वडिलांची   घरच्या नि   घेतली आणि आमचे लग्न रीतसर ठरले ,आई आणि माजीनी शेखरचे हि लग्न ठरवले ,दोन्ही विवाह  सोहळे एकाच दिवशी संपन्न झाले ,दादांना पाया पडताना दादांनी  मला मिठी मारली ,तुम्हाला  आशीर्वाद   देतो कि दिन दुबळया च्या  सेवेत  तुमचे आयुष्य संपन्न होऊ दे ,तुमचे बंधू तिथेच तुम्हाला भेटतील .दादा म्हणाले"   बंधूंच्या आठवणीने मन परत पाझरले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
आयुष्यात सुख ओसंडून जात होते ,रुग्णसेवे पुढे मला आणि मंजुषा ला  वेळ कमी पडत असे ,मंजुषा  कधीही तक्रार करत नव्हती ,वाहिनी सारखे तीनीही रुग्ण सेवेला बांधून घेतले होते .

मंजुषा गरोदर असल्याची बातमी तिनी मला सांगितली वहिनीनी तपासणी  करून त्यावर शिक्का मोर्तब केले. घरात सगळ्यांनाच आनद झाला आई ,माजी ,आणि वाहिनी ह्या तीन देवियांच्या निगराणी खाली मंजुषा चे कोड कौतुक होत होते. आनंदाचा क्षण जवळ येत होता .

एक दिवस राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागातून फोन आला बंधू रुग्णालयाच्या अपूर्व कामगिरी साठी केंद्र सरकार तर्फे माझा सत्कार होणार होता राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न होणार होता ,
शहरात हि बातमी कळली आणि बंधूवर लोकांची रीघ लागली ,हॉस्पिटलच्या सहकार्यांच्या उत्साहाला उधाण  आले होते .त्यनि सर्वत्र रोषणाई केली होती ,सतत स्वामी धून वाजत होति. दादांनी मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो पुढे नेले माझ्या डोक्या वरून हात फिरवला माझ्या मस्तकाचे  अवघ्राण करून ते म्हणाले "बंधू बघितला का हा आपला पंचम केवढा मोठा झालाय तो ,आगदी आभाळा येवढा त्याला आशीर्वाद द्या कि त्याच्या आभाळ मायेचे पांघरूण अनेक दिन दुबळ्यांना लाभू द्या .स्वमि कृपा त्याला सदैव साथ करू द्या .दादांच्या डोळ्यातून  वाहणारे अश्रू माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या  अश्रूत कधी सामावले ते कळले पण नाही .

दुसर्याच दिवशी दिल्लीला निघायचे होते ,मंजुषा चे दिवस भरत आले होते ,मी आणि शेखर दिल्लीला निघालो ,मंजुषाला अश्या अवस्थेत  सोडून जाताना माझ्या मनात काळजी डोकावत होती ,'माझ्या चेहऱ्या वरची काळजी पाहून    मंजुषा म्हणाली   तुम्ही काळजी करू नकात स्वामी आहेत माझ्या बरोबर ". मनावरचा मोठा बोझा  उतरला आणि काळजी 
स्वामींच्या पायाशी सोडून मी आणि शेखर दिल्लीला निघालो